आळंदीत साहित्यिकांचा महासंगम: राजेंद्र उदागे यांचे नवोदितांना संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन

राहुरी वेब प्रतिनिधी, २८ जुलै ( शरद पाचारणे ): नवोदित कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेने यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आळंदी देवाची येथे दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्यसंमेलनाचे आयोजन केले आहे. या काव्यसंमेलनात नवोदित कवींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.

गेल्या २० वर्षांपासून शब्दगंध साहित्यिक परिषद विविध उपक्रम राबवत आहे, ज्यात पुस्तक प्रकाशन, काव्यसंमेलन, कथा-कविता लेखन कार्यशाळा, पुस्तकांवर परिसंवाद, राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आणि बालसंस्कार शिबिरांचा समावेश आहे. यापूर्वी महाबळेश्वर येथे संस्थेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद व काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

सहभागासाठी अटी आणि संपर्क:

या काव्यसंमेलनात सहभागी होण्यासाठी कवींनी आपली काव्यरचना, परिचय आणि पासपोर्ट साईज फोटो ३१ जुलै २०२५ पर्यंत ९९२१००९७५० या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा:

कोहिनूर मंगल कार्यालयात राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या आयोजनावर चर्चा झाली. यावेळी संस्थापक सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्यवाह शाहीर भारत गाडेकर, राजेंद्र चोभे, प्रा. डॉ. अनिल गर्जे, मकरंद घोडके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने नवीन लेखकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यात येते, ज्यासाठी संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. नवीन सभासद वाढवण्यासाठीच या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

संस्थेच्या विस्ताराचे नियोजन:

सध्या जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर येथे संस्थेच्या जिल्हा शाखा कार्यरत आहेत आणि इतर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *