राहुरी वेब प्रतिनिधी,०३ (शरद पाचारणे ) : तालुक्यातील येवले आखाडा येथे राहणारे ७० वर्षीय शेतकरी नामदेव रामचंद्र कडू यांना १ जून २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर शिवीगाळ व हातपाय तोडून टाकण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी नामदेव कडू यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव कडू यांच्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, येवले आखाडा येथील १) मंदाबाई रेवन्नाथ गाडे २) रेवन्नाथ लहानु गाडे ३) त्याचा विवाहित मुलगा ४) त्याचा दुसरा विवाहित मुलगा ५) बाबा मोहन येवले ६) त्याचा विवाहित मुलगा ७) त्याचा दुसरा विवाहित मुलगा ८) ज्ञानदेव नाना येवले ९) दतात्रय श्रीधर मोढे १०) लक्ष्मण दतात्रय मोढे, सर्व रा येवले आखाडा ता राहुरी यांनी संगनमत करून त्यांना घरासमोर गाठले. या सर्व आरोपींनी मिळून त्यांना घाणघाण शिविगाळ केली आणि हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली.
नामदेव कडू यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत .