राहुरी सोमवारी दिनांक २६ मे रोजी स्वामी समर्थांच्या स्वयंभू पालखीचे आगमन

राहुरी वेब प्रतिनिधी,२२( शरद पाचारणे )-   राहुरी शहरात २६ मे रोजी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या पालखी पालकांचे आगमन होणार आहे. सदर अक्कलकोट स्वामी समर्थ पालखी पादुकांचे हे राहुरीत २८ वे वर्ष आहे. राहुरी येथील भाविक भक्त दरवर्षी नित्य नियमाने या पालखी पादुकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात. ज्या भाविकांना अक्कलकोट येथे जाऊन प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन घेणे शक्य नाही अशा भक्तांसाठी या पालखीचे आगमन म्हणजे एक पर्वणी समजली जाते. राहुरीतील स्वामी भक्त आहेर कुटुंबीय हे मोठ्या भक्ती भावाने या पालखीचे स्वागत करीत असतात व पालखी पादुका राहुरीला आणण्यासाठी आहेर कुटुंबीयांचा मोठा सहभाग असून या स्वामी समर्थांच्या स्वयंभू पादुकांच्या पालखीला दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे.   श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वयंभू पादूकांचे दर्शन अखिल महाराष्ट्रातील भाविक भक्तांना घडावे व अनेक भावीक भक्तांना अक्कलकोट येथे स्वामींच्या मूळ समाधीस्थानाचे दर्शन घेण्यासाठी अनेक अडचणी येतात त्या भाविक भक्तांसाठी ही अपूर्व संधी आहे. सुमारे १४५ वर्षापासून स्वामींच्या संतत्वाची संपूर्ण भारतभर महती आहे. अशा या स्वयंभू पादुका पालखीचे आगमन २६ मे रोजी राहुरीत दुपारी पाच वाजता होत असून त्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्री अक्कलकोट स्वामींच्या पालखीची मिरवणूक श्री शनि मंदिरापासून सुरू होऊन नवी पेठ मार्गे नगर मनमाड रोड वरून कुलकर्णी हॉस्पिटल समोर शिवाजी चौक ते शनी मंदिर जवळ पालखीचे आगमन होणार असून त्यावेळी शोभेच्या तरी स्वामींच्या पालखी पादुकांच्या या सोहळा कार्यक्रमास भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ भक्त मंडळ राहुरी शहर व राहुरी तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *