राहुरीच्या विकासाचे प्रणेते डॉ. दादासाहेब तनपुरे, भाऊ पाटील नवले यांचे प्रतिपादन

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ):-
सहकारमहर्षी डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांचे केवळ  तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे ,असे प्रतिपादन अकोला येथील जनलक्ष्मी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ पाटील नवले यांनी केले .गुहा येथील प्रेरणापतसंस्था व मल्टिस्टेट च्या वतीने संस्थेच्या मुख्य कार्यालयात डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे  समारंभाचे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख भाषणात भाऊ पाटील नवले म्हणाले, डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी राहुरी सहकारी साखर कारखाना उभा केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांच्या उभारणीतही त्यांनी मार्गदर्शन केले .मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था स्थापन करून आशिया खंडातील पहिला प्रयोग यशस्वी केला .तसेच मुळा धरणाच्या निर्मितीतून राहुरीच नव्हे तर जिल्ह्यात जिरायती भागाला पाणी मिळाले .त्यामुळे शेती समृद्ध झाली. व राहुरी येथे कृषी विद्यापीठ स्थापनात्यांच्या विकासाच्या कामामुळे आजही त्यांची कार्य प्रेरणादायी आहे. तनपुरे सहकारी साखर कारखान्याशी संलग्न शिक्षण संस्था उभारल्या. त्यामुळे शिक्षणाची गंगा तालुक्यात खेड्यापाड्यात पोहोचली .यावेळी डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.जनलक्ष्मी पतसंस्था संचालक कैलास शेळके, राहुरी तालुका ट्रक ट्रान्सपोर्टचे मा.चेअरमन आप्पासाहेब कोहकडे, संचालक ज्ञानदेव हारदे व सभासद, कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते .आभार प्रेरणा मल्टिस्टेट व्हा.चेअरमन प्रा.वेणुनाथ लांबे यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *