राहुरी वेब प्रतिनिधी,२६ (शरद पाचारणे )-
राहुरी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या गणेगाव येथे उच्चशिक्षित असलेल्या स्वामी संजय महाराज व स्वामी विजय महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या वसंत बालसंस्कार शिबिरातून शेकडो विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक, योगासने, हरीपाठ व स्वरक्षणाचे धडे घेतले आहे. या शिबिरामुळे गणेगाव व पंचक्रोशीतील चिमुकले मोबाईल व टिव्हीपासून वंचित झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
उच्चशिक्षित असलेल्या स्वामी संजय महाराज व स्वामी विजय महाराज यांनी नोकरीच्या त्याग करून अध्यात्माची कास धरली. गेल्या दोन वर्षांपूर्वी आळंदी येथून ते गणेगाव गावात आले. एक रुपयाची अपेक्षा न करता माधुगिरि मागून दैनदिन दिनचर्या आजतागायत पार पडत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते २५ मे दरम्यान वसंत बालसंस्कार शिबिर पार पडले. या शिबिरात जवळपास १५० चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला. रविवारी सायंकाळी या शिबिराचा समारोप पार पडला. महंत उद्धव महाराज मंडलिक, विकासानंद महाराज मिसाळ यांनी यानिमित्ताने भेट देऊन शिबिरातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या शिबिरात विद्यार्थ्यांना स्वामी संजय महाराज, स्वामी विजय महाराज यांच्यासह पानसरे सर, गोविंद महाराज निर्वळ, पांडुरंग महाराज आखरे, बाबासाहेब महाराज कोबरणे, यश जोशी, समर्थ पगारे यांनी मार्गदर्शन केले. योगासने, हरीपाठ, मनाचे श्लोक, संस्कृत संभाषण, दंड प्रशिक्षण धडे देण्यात आले.
शिबिराच्या सांगता प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे , सरपंच शोभा भनगडे, पोपट कोबरणे, विकास कोबरणे, किशोर वरघुडे, प्रवीण नवले गुरू, कैलास कोबरणे, बाळासाहेब रामभाऊ कोबरणे, विजय बबन कोबरणे ,भाऊसाहेब कोबरणे, सुनिल कोबरणे, प्रकाश कोबरणे काशिनाथ कोबरणे,सतिश कोबरणे, हरीभाऊ कोबरणे, दतु ढवळे, राजु कोबरणे, दीपक घोरपडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.