राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे) – राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराज तान्हाजी धसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी श्रीमती व्हि.ए.सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक संपन्न झाली यावेळी सदर निवड करण्यात आली. तांदुळवाडी ग्रा.पं.ची सन 2022 मध्ये निवडणूक झाली होती. यावेळी एका गटाचे 9, एका गटाचे 2 तर अपक्ष 2 असे बलाबल झाले होते. 9 सदस्य असणाऱ्या गटात सरपंच पदावरून उभी फूट पडून 2 सदस्य असणाऱ्या गटाची सत्ता आली होती. परंतु त्यानंतर एक वर्षाच्या आत अतिक्रमणाच्या विषयातून सरपंच पद अपात्र ठरले. नंतर झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडले. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकून निवड झाली. तांदुळवाडीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच चिठ्ठीने सरपंच निवडला गेला. परंतु समसमान मते पडल्याने सत्ताधारी ना.राधाकृष्ण विखे पाटील व माजी आ.प्राजक्त तनपुरे यांच्या गटाला नवीन सरपंच निवड करणे अशक्य होते. दरम्यान ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ.शिवाजीराव कर्डिले यांनी सदर निवडीत लक्ष घालून दोन्ही गट एकत्र होण्याच्या सूचना केल्या होत्या अशी चर्चा होत आहे.
निवड प्रक्रियेत तलाठी शरद गिते, ग्रामविकास अधिकारी संजय भिंगारदे यांनी सहकार्य केले. यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारे, जेष्ठ सदस्य निसार सय्यद, शिवाजी खडके, स्वाती धसाळ, अश्विनी चव्हाण, शितल आढाव,विमल पेरणे, अनिता निकम, शितल पेरणे, गणपत पेरणे, विक्रम पेरणे आदिंसह राहुरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष तानाजीराव धसाळ, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ, माजी सरपंच मच्छिंद्र पेरणे, डॉ.शिवाजी धसाळ, शामराव पेरणे, नानासाहेब चव्हाण, भाऊसाहेब पेरणे, अविनाश पेरणे, मच्छिंद्र चव्हाण, संजय धागुडे, उत्तम खाटेकर, योगेश पेरणे, प्रमोद खडके, अशोक धागुडे, ईश्वर खिलारे, मच्छिंद्र मोरे, उमेश पेरणे, शिवप्रसाद पेरणे, आदी उपस्थित होते. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. नूतन सरपंच विराज धसाळ यांचे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन आ.शिवाजीराव कर्डिले, माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
चौकट 1 – ( जिल्हा बँकेचे चेअरमन आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या आदेश व सुचनेनुसार आम्ही सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरला नाही. गावाच्या विकासासाठी आमच्या गटाच्या सदस्यांनी बिनविरोध सरपंच निवडीच्या प्रक्रियेस सहकार्य केले असे ग्रा.पं.सदस्य सौ.स्वाती विनित धसाळ, सौ.अश्विनी मच्छिंद्र चव्हाण, सौ. शितल भैय्यासाहेब आढाव, जेष्ठ पत्रकार निसार सय्यद व शिवाजी खडके यांनी सांगितले.)
चौकट 2 – (सरपंच निवड प्रक्रियेत दोन वेळा विखे गटाने कर्डिले गटाला सरपंच पदाच्या सत्तेपासून रोखण्यासाठी तनपुरे गटाला पाठिंबा दिला होता. मात्र आता यावेळी विखे गटाने कर्डिले गटाच्या सदस्यांसह तनपुरे गटाचा देखील पाठिंबा मिळविल्याने बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता भविष्यातील राजकीय परिस्थिती कशी असेल याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.)